spot_img
5.7 C
New York
Monday, December 1, 2025

Buy now

spot_img

नगर-शिर्डी-मनमाड महामार्गाचे तिन्ही ठेकेदार काळ्यायादीत; बँक गॅरंटी जप्त…केद्रिय मंञी गडकरी

राहाता: अहिल्यानगर-शिर्डी-मनमाड या रस्त्याचे काम वेळेत पूर्ण न केलेल्या तिन्ही ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याबरोबरच त्यांची बॅक गॅरंटी जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. या कामासाठी नव्याने निविदा काढण्यात आली असून, हा रस्ता सहा पदरी असणार आहे. हे काम लवकरच पूर्ण होईल, असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री गडकरी यांनी सांगितले. अहिल्यानगर जिल्ह्यातून जाणाऱ्या सुरत ते चेन्नई हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा हरित महामार्ग देशाच्या दृष्टीने ‘हार्टलाईन’ ठरेल व जिल्हा औद्योगिक विकासात महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरेल. शेतकऱ्यांनो जमिनी विकू नका, असा सल्लाही त्यांनी दिला.


३२६ कोटी रुपये खर्चाच्या नांदुर शिंगोटे ते कोल्हार या ४७ किमी. राष्ट्रीय महामार्गाच्या, ७५० कोटी रुपये खर्चाचा अहिल्यानगर- सबलखेड-आष्टी-चिंचपूर ५० किमी. रस्ता, ३९० कोटीचा बेल्हे-अळकुटी- निघोज-शिरुर रस्ता व ११ कोटीच्या श्रीगोंदा शहरातील पुलाच्या कामांचा शुभारंभ गडकरी यांच्या हस्ते आज, —–शुक्रवारी लोणी येथे करण्यात आला. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास खासदार भाऊसाहेब वाकचौरे, खासदार राजाभाऊ वाजे, माजीमंत्री आण्णासाहेब म्हस्के, डॉ. सुजय विखे, आ. मोनिका राजळे, आ. काशिनाथ दाते, आ. विठ्ठलराव लंघे, आ. विक्रमसिंह पाचपुते, आ. अमोल खताळ, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ.राजेंद्र विखे, मुख्य अभियंता संतोष शेलार, प्रशांत फेगडे, अधीक्षक अभियंता दयानंद विभुते आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या कामाची लांबी २०२ किमी. होती. विद्यमान शासनाच्या काळात रस्ते विकासाची ८७० किमी. कामे केल्याने ही लांबी आता १ हजार ७१ किमी. झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६ हजार २०८ कोटींची रस्त्यांची कामे पूर्ण झाल्याचेही त्यांनी सांगितले. धुळे-अहिल्यानगर हा ‘बीओटी’ तत्त्वावरील रस्त्याचा ‘डीपीआर’ करण्यात येत असून, उपलब्ध जागेनुसार हा मार्ग सहा पदरी करण्याचा प्रयत्न आहे. अहिल्यानगर-करमाळा-टेंभुर्णी- सोलापूर या ८० किमी. रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी १ हजार १०० कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती त्यांनी दिली

Related Articles

राज्यातील पहिल्या टप्प्याच्या नगरपरिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला.. 2 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबर ला मतमोजणी

मुंबई सार्वमंथन/   राज्य निवडणूक आयोगाने आज राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यभर निवडणुकांचा बार उडाला आहे. पाच वर्षांनंतर होणाऱ्या या निवडणुका...

५ नोव्हेंबरला राहुरीत भाजप-महायुतीचा निर्धार मेळावा नामदार राधाकृष्ण विखे, डॉ. सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप कार्यकर्त्यांना देणार मार्गदर्शन

राहुरी / प्रतिनिधी राहुरी तालुक्यातील राजकीय समीकरणांना नवसंजीवनी देणारा ठरणारा भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांचा     निर्धार मेळावा बुधवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!