spot_img
32.8 C
New York
Friday, June 5, 2026

Buy now

spot_img

मुळा धरणाचा विसर्ग २५ हजार क्युसेसवर; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

मुळा धरणाचा विसर्ग २५ हजार क्युसेसवर; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

राहुरी/ सार्व मंथन
राहुरी तालुक्यातील प्रमुख जलस्रोत असलेल्या मुळा धरणाच्या आवक-विसर्गामध्ये वाढ होत असून आज दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम राहिला. त्यामुळे धरणातील पाणीपातळी वाढल्याने विसर्गात ५ हजार क्युसेसने वाढ करून एकूण २५ हजार क्युसेस इतका करण्यात आला आहे.

सध्या धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू असून परिस्थितीनुसार विसर्गात कमी-जास्त बदल करण्याची कार्यवाही केली जाईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. मुळा नदीकाठच्या सर्व गावांमधील नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने सतर्क राहावे, अनावश्यक हालचाली टाळाव्यात, असे आवाहन तहसील प्रशासन व जलसंपदा विभागाने केले आहे.

नदीपात्रात पाण्याचा प्रवाह वेगाने वाढत असल्याने नदीकाठावरील शेतकरी, ग्रामस्थ, तसेच जनावरे सांभाळणारे नागरिक यांनी तातडीने सुरक्षित स्थळी हलवावे, असा इशारा देखील प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Related Articles

विधान परिषदेच्या आमदारकीसाठी विधान परिषदेचे सभापती शिंदे मंत्री विखेंच्या उपस्थितीत अर्ज दाखल..

अहिल्यानगर/ सार्व मंथन /प्रतिनिधी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले असून, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज सोमवारी दमदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज...

रक्तदानातून दिवंगत कर्डिले साहेबांना अभिवादन; राजकीय दिग्गजांची एकत्रित उपस्थिती

रक्तदानातून दिवंगत कर्डिले साहेबांना अभिवादन; राजकीय दिग्गजांची एकत्रित उपस्थिती     कर्डिले यांच्या जयंतीनिमित्त सेवा-समर्पणाचा संदेश; अक्षयदादा प्रतिष्ठानचा सामाजिक उपक्रम गाजला     दिव्य सार्वमंथन/ प्रतिनिधी स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!