दारु पिऊन का आले,याचा जाब पत्नीने विचारल्याने उचलले टोकाचे पाऊल…?
राहुरी दि.30 मे.
जागतिक दर्जाचे देवस्थान म्हणून ओळख असलेल्या शनि शिंगणापूर देवस्थानच्या राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे येथील रहिवासी असलेल्या विवाहित तरुणाने राहत्या घरातील अॅगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे येथील दारु पिवून का आले. याचा जाब पत्नीने विचारल्याच्या कारणातून अमोल बाळासाहेब नालकर या 27 वर्षीय तरुणाने टोकाचे पाऊल उचलत राहत्या घरात गळफास घेत आपला अखेरचा प्रवास संपविल्याची घटना घडली आहे.
सदर घटनेमुळे चिंचविहिरे परिसरामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
मयत तरुणाने यापूर्वीही दोन ते तीन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचे समजले आहे अमोल नालकर हा विवाहित तरूण शनि शिंगणापूर देवस्थान मध्ये कामगार होता.
आज शुक्रवार त्याला नाईट दिवटी असल्याचे समजले आहे.
त्याचे लहान मुले चुलत्याच्या घरी गेले होते त्यांना घेऊन ये असे पत्नीला सांगितले व पत्नी मुलांना आणण्यासाठी गेली असता त्याने आपल्या राहत्या घरी अॅगलला
त्याच्या पश्चात आई,वडील, पत्नी ,दोन मुले, तिन बहिणी मेव्हणे असा परिवार आहे.