राहुरी तालुक्यातील धक्कादायक घटना…
राहुरी फॅक्टरी दि.30 मे.
राहुरी तालुक्यातील तांभेरी येथिल 21 वर्षीय मजुरी करणाऱ्या आदिवासी समाजाच्या तरुणाने कुठल्यातरी नैराश्यातून वन खात्याच्या जमिनीत असलेल्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविल्याची धक्कादायक घटना घडली असुन मयत तरुणाचे नाव विजय दिगंबर जाधव असे समजले आहे.
विजय जाधव या तरुणाचा 10 जून रोजी विवाह संपन्न होणार होता.
या घटनेमुळे परिसरात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे.
आज शुक्रवारी कुटुंबातील सर्वच नातेवाईक लग्न सोहळ्याचा बस्ता बांधण्यासाठी जाणार होते. मी जेवन करुन येतो असे सांगून विजय गेला व आपली अखेरची जिवन यात्रा संपवली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की राहुरी तालुक्यातील तांभेरे येथिल विजय जाधव या मजुरी करणाऱ्या 21 वर्षीय तरुणाने घरापासून काही अंतरावर असलेल्या वन विभागाच्या क्षेत्रातील लिंबाच्या झाडाला कुठल्या तरी नैराश्यातून गळफास घेऊन आपली अखेरची जिवन यात्रा संपवली आहे.
या तरुणाच्या पश्चात आई वडील भाऊ बहिण असा परिवार आहे.
या तरुणाने नेमके कोणत्या कारणामुळे आत्महत्याचे पाऊल उचलले हे मात्र सध्या तरी गुलदस्त्यात आहे.