spot_img
-0.2 C
New York
Wednesday, December 3, 2025

Buy now

spot_img

देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या हद्दीतील राहुरी फॅक्टरी परिसरात आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर ….?

 

नागरिकांचे आरोग्य धोक्यात…? आरोग्य विभागातील त्या कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता..!
राहुरी फॅक्टरी / दि. 3 जून

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील क वर्ग दर्जा असलेल्या नगरपालिका हद्दीमध्ये घाणीचे मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले असून ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे या ठिकाणी स्वच्छता कर्मचारी अपुरे पडत असल्याकारणाने स्वच्छतेचा अक्षरशा बुजवारा उडाला असल्याने नगरपालिकेच्या या कारभाराबाबत नागरिकांनी मोठा संताप व्यक्त केला आहे.
देवळाली नगर परिषदेवर प्रशासक राज असल्याकारणाने नगरपालिकेच्या हद्दीत आरोग्यमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
राज्यात स्वच्छतेबाबत बक्षीस मिळविणाऱ्या देवळाली प्रवारा नगरपालिका प्रशासन स्वच्छतेबाबत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांनी आरोप केला आहे.
मात्र प्रशासकाच्या छुप्या आशीर्वादाने आरोग्याचा ठेका घेणाऱ्या ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना आरोग्य बाबत सामना करावा लागत आहे.
देवळाली प्रवरा नगर परिषद हद्दित चेंबर उघडे असून यामध्ये काही ठिकाणी गटारीच्या चेंबर मधून दुर्गंधी युक्त सांडपाणी बाहेर येताना दिसत आहे.
अशीच काहीशी परिस्थिती अंबिका नगर, प्रसाद नगर, आदिनाथ वसाहत, गुरुकुल वसाहत देवळाली परिसरातील विविध भागामध्ये निदर्शनास येत आहे. ठेकेदारांनी नेमून दिलेल्या सफाई कामगार हे संबंधित ठिकाणी साफसफाई व स्वच्छता करत नसल्याने नागरिकांनी मोठा संताप व्यक्त केला आहे.
देवळाली नगरपालिकेने स्वच्छता भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यात कपात केले असल्याचे समजले असुन नगर परिषदेच्या हद्दीत घाणिचे साम्राज्य झालेले आहे.
प्रसाद नगर भागातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा तसेच त्यासमोरील असलेले शौचालय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काटेरी झाडी झुडपी वाढलेली असून याकडे पालिकेचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष होत आहे.
हे कामे त्वरित न झाल्यास नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही याकडे नगर पालिकेने लक्ष न दिल्यास लवकरच नागरिक पालिकेवर मोर्चा आणण्याच्या तयारीत असल्याचे समजले आहे.

  • सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र / प्रतिनिधी अभिजीत आहेर
    राहुरी फॅक्टरी

Related Articles

राज्यातील पहिल्या टप्प्याच्या नगरपरिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला.. 2 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबर ला मतमोजणी

मुंबई सार्वमंथन/   राज्य निवडणूक आयोगाने आज राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यभर निवडणुकांचा बार उडाला आहे. पाच वर्षांनंतर होणाऱ्या या निवडणुका...

५ नोव्हेंबरला राहुरीत भाजप-महायुतीचा निर्धार मेळावा नामदार राधाकृष्ण विखे, डॉ. सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप कार्यकर्त्यांना देणार मार्गदर्शन

राहुरी / प्रतिनिधी राहुरी तालुक्यातील राजकीय समीकरणांना नवसंजीवनी देणारा ठरणारा भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांचा     निर्धार मेळावा बुधवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!