spot_img
3.1 C
New York
Thursday, January 22, 2026

Buy now

spot_img

मुळा धरणाचा विसर्ग २५ हजार क्युसेसवर; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

मुळा धरणाचा विसर्ग २५ हजार क्युसेसवर; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

राहुरी/ सार्व मंथन
राहुरी तालुक्यातील प्रमुख जलस्रोत असलेल्या मुळा धरणाच्या आवक-विसर्गामध्ये वाढ होत असून आज दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम राहिला. त्यामुळे धरणातील पाणीपातळी वाढल्याने विसर्गात ५ हजार क्युसेसने वाढ करून एकूण २५ हजार क्युसेस इतका करण्यात आला आहे.

सध्या धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू असून परिस्थितीनुसार विसर्गात कमी-जास्त बदल करण्याची कार्यवाही केली जाईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. मुळा नदीकाठच्या सर्व गावांमधील नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने सतर्क राहावे, अनावश्यक हालचाली टाळाव्यात, असे आवाहन तहसील प्रशासन व जलसंपदा विभागाने केले आहे.

नदीपात्रात पाण्याचा प्रवाह वेगाने वाढत असल्याने नदीकाठावरील शेतकरी, ग्रामस्थ, तसेच जनावरे सांभाळणारे नागरिक यांनी तातडीने सुरक्षित स्थळी हलवावे, असा इशारा देखील प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Related Articles

राज्यातील पहिल्या टप्प्याच्या नगरपरिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला.. 2 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबर ला मतमोजणी

मुंबई सार्वमंथन/   राज्य निवडणूक आयोगाने आज राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यभर निवडणुकांचा बार उडाला आहे. पाच वर्षांनंतर होणाऱ्या या निवडणुका...

५ नोव्हेंबरला राहुरीत भाजप-महायुतीचा निर्धार मेळावा नामदार राधाकृष्ण विखे, डॉ. सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप कार्यकर्त्यांना देणार मार्गदर्शन

राहुरी / प्रतिनिधी राहुरी तालुक्यातील राजकीय समीकरणांना नवसंजीवनी देणारा ठरणारा भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांचा     निर्धार मेळावा बुधवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!