spot_img
22.8 C
New York
Monday, July 20, 2026

Buy now

spot_img

मुळा धरणाचा विसर्ग २५ हजार क्युसेसवर; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

मुळा धरणाचा विसर्ग २५ हजार क्युसेसवर; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

राहुरी/ सार्व मंथन
राहुरी तालुक्यातील प्रमुख जलस्रोत असलेल्या मुळा धरणाच्या आवक-विसर्गामध्ये वाढ होत असून आज दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम राहिला. त्यामुळे धरणातील पाणीपातळी वाढल्याने विसर्गात ५ हजार क्युसेसने वाढ करून एकूण २५ हजार क्युसेस इतका करण्यात आला आहे.

सध्या धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू असून परिस्थितीनुसार विसर्गात कमी-जास्त बदल करण्याची कार्यवाही केली जाईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. मुळा नदीकाठच्या सर्व गावांमधील नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने सतर्क राहावे, अनावश्यक हालचाली टाळाव्यात, असे आवाहन तहसील प्रशासन व जलसंपदा विभागाने केले आहे.

नदीपात्रात पाण्याचा प्रवाह वेगाने वाढत असल्याने नदीकाठावरील शेतकरी, ग्रामस्थ, तसेच जनावरे सांभाळणारे नागरिक यांनी तातडीने सुरक्षित स्थळी हलवावे, असा इशारा देखील प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Related Articles

२० वर्षे न्यायाचा खेळखंडोबा! पवनराजे हत्या प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष — मग खून कोणी केला?”

२० वर्षे न्यायाचा खेळखंडोबा! पवनराजे हत्या प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष — मग खून कोणी केला?”   साक्षीदार फितुर, पुरावे गायब, तपासावर न्यायालयाचे ताशेरे; लोकशाहीत न्याय मिळतो...

राहुरीत रेशन धान्याचा काळाबाजार उघड! सोनगाव सात्रळमध्ये 12 लाखांचा मुद्देमाल जप्त… स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; तरुण अटकेत, दोन वाहनांसह गहू-तांदळाचा साठा पकडला

राहुरी प्रतिनिधी | जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर लगाम घालण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेने मोठा धक्का देत राहुरी तालुक्यातील सोनगाव सात्रळ शिवारात रेशनिंगच्या धान्याचा...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!