spot_img
4.7 C
New York
Sunday, November 30, 2025

Buy now

spot_img

अहिल्या नगरचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यासह पाच जण व एका महिलेवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल….

अहिल्या नगर :दि.१८ मे.

अहिल्या नगर महानगरपालिके माजी महापौर तसेच शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्यावर आर्थिक कारणावरुन एका तरुणास डांबून ठेवून मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. रवींद्र रामराव शेळके यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात मच्छिंद्र झेंडे, अभिषेक कळमकर, लालू उर्फ अभिषेक जगताप, तसेच एक महिलेसह अनोळखी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मागील आर्थिक कारणावरुन वेगवेगळ्या ठिकाणी डांबून ठेवून रवींद्र रामराव शेळके यांना मारहाण करून त्यांच्याकडून विविध स्टॅम्पवर बळजबरीने सह्या घेण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. रवींद्र रामराव शेळके हा माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्याकडे दहा वर्षापासून चालक म्हणून कामाला होते. मात्र कळमकर यांच्याशी आर्थिक कारणावरुन वाद झाल्याने रवींद्र शेळके याने दोन वर्षापासून चालक म्हणून असलेली नोकरी सोडून दिली होती. सहा महिन्यापूव सुद्धा रवींद्र रामराव शेळके यांच्या अंगाराव गाडी घालून मारण्याचा प्रयत्न झाला असल्याचा आरोप शेळके यांनी केला असून या प्रकरणी त्यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात तक्रार केली असल्याचे सांगितले.

12 मे रोजी रवींद्र रामराव शेळके यांचे नगर सोलापूर रोडवरून पांढऱ्या व रंगाच्या टोयाटो कंपनीच्या वाहनातून आलेल्या लोकांनी अपहरण करून त्यांना चिखली या ठिकाणी नेऊन मारहाण करण्यात आली. तसेच एका महिले बरोबर बळजबरीने फोटो काढून घेण्यात आले आणि त्यानंतर काही नोटरी आणि कागदपत्रांवर बळजबरीने सह्या घेतल्या असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या पासून आपल्याला आणि कुटुंबाला धोका असल्याने शेळके यांनी केली संरक्षणाची मागणी केली आहे. याबाबत माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही मात्र या घटनेमुळे अहिल्यानगर मध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमध्ये नेमकं सत्य काय आहे? याचाही छडा पोलिसांना लावणे आव्हानात्मक असल्याचे बोलले जात आहे.

Related Articles

राज्यातील पहिल्या टप्प्याच्या नगरपरिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला.. 2 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबर ला मतमोजणी

मुंबई सार्वमंथन/   राज्य निवडणूक आयोगाने आज राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यभर निवडणुकांचा बार उडाला आहे. पाच वर्षांनंतर होणाऱ्या या निवडणुका...

५ नोव्हेंबरला राहुरीत भाजप-महायुतीचा निर्धार मेळावा नामदार राधाकृष्ण विखे, डॉ. सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप कार्यकर्त्यांना देणार मार्गदर्शन

राहुरी / प्रतिनिधी राहुरी तालुक्यातील राजकीय समीकरणांना नवसंजीवनी देणारा ठरणारा भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांचा     निर्धार मेळावा बुधवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!