spot_img
2.5 C
New York
Tuesday, December 2, 2025

Buy now

spot_img

लग्न सोहळ्यातील बस्त्याच्या दिवशीच तरुणाने संपविली जिवन यात्रा….

राहुरी तालुक्यातील धक्कादायक घटना…
राहुरी फॅक्टरी दि.30 मे.
राहुरी तालुक्यातील तांभेरी  येथिल 21 वर्षीय  मजुरी करणाऱ्या आदिवासी समाजाच्या तरुणाने कुठल्यातरी नैराश्यातून वन खात्याच्या जमिनीत असलेल्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविल्याची धक्कादायक घटना घडली असुन मयत तरुणाचे नाव विजय दिगंबर जाधव असे समजले आहे.
विजय जाधव या तरुणाचा 10 जून रोजी विवाह संपन्न होणार होता.
या घटनेमुळे परिसरात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे.
आज शुक्रवारी कुटुंबातील सर्वच नातेवाईक लग्न सोहळ्याचा बस्ता बांधण्यासाठी जाणार होते. मी जेवन करुन येतो असे सांगून विजय गेला व आपली अखेरची जिवन यात्रा संपवली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की राहुरी तालुक्यातील तांभेरे येथिल विजय जाधव या मजुरी करणाऱ्या 21 वर्षीय तरुणाने घरापासून काही अंतरावर असलेल्या वन विभागाच्या क्षेत्रातील लिंबाच्या झाडाला कुठल्या तरी नैराश्यातून गळफास घेऊन आपली अखेरची जिवन यात्रा संपवली आहे.
या तरुणाच्या पश्चात आई वडील भाऊ बहिण असा परिवार आहे.
या तरुणाने नेमके कोणत्या कारणामुळे आत्महत्याचे पाऊल उचलले हे मात्र सध्या तरी गुलदस्त्यात आहे.

Related Articles

राज्यातील पहिल्या टप्प्याच्या नगरपरिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला.. 2 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबर ला मतमोजणी

मुंबई सार्वमंथन/   राज्य निवडणूक आयोगाने आज राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यभर निवडणुकांचा बार उडाला आहे. पाच वर्षांनंतर होणाऱ्या या निवडणुका...

५ नोव्हेंबरला राहुरीत भाजप-महायुतीचा निर्धार मेळावा नामदार राधाकृष्ण विखे, डॉ. सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप कार्यकर्त्यांना देणार मार्गदर्शन

राहुरी / प्रतिनिधी राहुरी तालुक्यातील राजकीय समीकरणांना नवसंजीवनी देणारा ठरणारा भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांचा     निर्धार मेळावा बुधवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!