spot_img
19.2 C
New York
Sunday, September 20, 2026

Buy now

spot_img

लग्न सोहळ्यातील बस्त्याच्या दिवशीच तरुणाने संपविली जिवन यात्रा….

राहुरी तालुक्यातील धक्कादायक घटना…
राहुरी फॅक्टरी दि.30 मे.
राहुरी तालुक्यातील तांभेरी  येथिल 21 वर्षीय  मजुरी करणाऱ्या आदिवासी समाजाच्या तरुणाने कुठल्यातरी नैराश्यातून वन खात्याच्या जमिनीत असलेल्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविल्याची धक्कादायक घटना घडली असुन मयत तरुणाचे नाव विजय दिगंबर जाधव असे समजले आहे.
विजय जाधव या तरुणाचा 10 जून रोजी विवाह संपन्न होणार होता.
या घटनेमुळे परिसरात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे.
आज शुक्रवारी कुटुंबातील सर्वच नातेवाईक लग्न सोहळ्याचा बस्ता बांधण्यासाठी जाणार होते. मी जेवन करुन येतो असे सांगून विजय गेला व आपली अखेरची जिवन यात्रा संपवली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की राहुरी तालुक्यातील तांभेरे येथिल विजय जाधव या मजुरी करणाऱ्या 21 वर्षीय तरुणाने घरापासून काही अंतरावर असलेल्या वन विभागाच्या क्षेत्रातील लिंबाच्या झाडाला कुठल्या तरी नैराश्यातून गळफास घेऊन आपली अखेरची जिवन यात्रा संपवली आहे.
या तरुणाच्या पश्चात आई वडील भाऊ बहिण असा परिवार आहे.
या तरुणाने नेमके कोणत्या कारणामुळे आत्महत्याचे पाऊल उचलले हे मात्र सध्या तरी गुलदस्त्यात आहे.

Related Articles

पालकमंत्री विखे पाटलांचा नादखुळा अंदाज! ढोल पथकात जाऊन वाजवला दणदणीत ढोल.

पालक मंत्री विखे पाटलांचा नादखुळा अंदाजे! ढोल पावताला वाजवला दाणदणीत ढोल. श्रीरामपूर गणेशोत्सव उत्साह शिगेला भेटायला हवे होते. सार्वजनिक गणेशोत्सव श्रीरामपूर दौऱ्यांवर विखे पाटलांनी ढोल...

सामाजिक कार्यकर्ता नाना डोंगरे को ‘दादा साहब फाल्के स्मृति दिवस सम्मान पुरस्कार’ से सम्मानित किया गया

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सामाजिक क्षेत्रात सातत्याने विविध विधायक उपक्रम राबवून ग्रामीण भागाच्या विकासासाठी योगदान देणारे अहिल्यानगरचे सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना चित्रपट महर्षी दादासाहेब...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!